तरंग

June 28, 2006

Filed under: चौफ़ेर — Giriraj @ 6:54 am

बरखा दत्त यांच्या या बातमीवरून:

http://www.ndtv.com/columns/showcolumns.asp?id=1043

मला तर वाततं हेच मराठीबद्दलही तितकंच खरं आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या ईतरभागातून मुले पुणे किंवा मुंबईत येतात तेव्हा त्यांना हाच अनुभव येतो. अर्थातच त्या त्या भागातिल बोलीनुसारच त्यांचे मराठी किंवा इंग्रजीचे उच्चार असतात. या गोष्टीची सरसकट टिंगल होते.अश्या वेळी शिक्षकांनी याबाबत इतरही मुलांशी बोललं पाहीजे.अश्या प्रकारांमुळे या विद्या्र्थ्यांना न्यूनगंड येऊ शकतो.

आपल्या बोलीही तितक्याच गोड आहेत .. त्यांना जपलंच पाहिजे!

June 21, 2006

आस उस दर की…

Filed under: मनातलं — Giriraj @ 2:16 pm

कधी कधी परीणाम माहीत असूनही आपण काही गोष्टीं मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी खूपच वेडे होतो.कधी कधी कश्याचीच शाश्वति नसते आणि तरीही आपण पेटून उठतो… गाठायचेच ध्येय म्हणून! अश्या वाटेवर कधी खूप निराश करणारे क्षण येतात.पण मन मानतच नाही.या निराशेतूनच जिद्द उफ़ाळून येते… काय वेड असेल हे? कुठून आलं हे माणसांत?

कधी शहाणपणा म्हणुउन तर कधी व्यवहार म्हणून दूर जाण्याचा प्रयत्न होतो.पण शेवटी हा दूर जाण्याचा विचारच पुन्हा ्त्या ध्येयासाठी झगडण्याची उर्मी देतो.

फ़ैज़ यांचा एक शेर अश्या प्रत्येक वेळेला हमखास आठवतो….

आस उस दर कि छूटती ही नहीं

जाके देखा,न जाके देख लिया

अश्याच एका आशेवर साधलेली ही 'सम'!

Blog at WordPress.com.