कधी कधी परीणाम माहीत असूनही आपण काही गोष्टीं मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी खूपच वेडे होतो.कधी कधी कश्याचीच शाश्वति नसते आणि तरीही आपण पेटून उठतो… गाठायचेच ध्येय म्हणून! अश्या वाटेवर कधी खूप निराश करणारे क्षण येतात.पण मन मानतच नाही.या निराशेतूनच जिद्द उफ़ाळून येते… काय वेड असेल हे? कुठून आलं हे माणसांत?
कधी शहाणपणा म्हणुउन तर कधी व्यवहार म्हणून दूर जाण्याचा प्रयत्न होतो.पण शेवटी हा दूर जाण्याचा विचारच पुन्हा ्त्या ध्येयासाठी झगडण्याची उर्मी देतो.
फ़ैज़ यांचा एक शेर अश्या प्रत्येक वेळेला हमखास आठवतो….
आस उस दर कि छूटती ही नहीं
जाके देखा,न जाके देख लिया
अश्याच एका आशेवर साधलेली ही 'सम'!
छान आहे हा शेर
Comment by milind — June 26, 2006 @ 12:06 pm