तरंग

November 23, 2006

Filed under: मनातलं — Giriraj @ 7:25 am

रागात स्वतःला आवरणं खूप कठीण असते असे मला काही वाटत नाही.अगदी खूप राग येऊनही शांत राहण्याचा प्रकार करता येतो.आणि मी ते वेळोवेळी करूनही पाहिलंय!पण अशीही वेळ येते जेव्हा आपला ताबा पूर्णपणे सुटतो आणि आपण आपल्याच मनातल्या राक्षसाच्या तालावर नाचायला लागतो.अश्या वेळी मी कितीतरी वस्तू तोडून,मोडून टाकल्या आहेत.खूपदा विचार केला की मी माझा राग असा वस्तूंवर का काढतो?त्यातून होणारं आर्थिक नुकसान खूपदा जास्त असते.एकदा असाच विचार करतांना लक्षात आलं की हा राग कुठेतरी व्यक्त व्हायला हवा,मग तो असा वस्तूंवर निघतो.कितिही चिडलो तरी एखादी वेळ सोडता तो व्यक्तींवर निघत नाही.खरं तर माझं मन अश्या टोकाच्या अवस्थेतही ताबा पूर्ण सुटू देत नाही हेच खरं!

आता पुढची पायरी…

No Comments Yet »

No comments yet.

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Blog at WordPress.com.